‘मनुष्याच्या अस्तित्वासाठी देवराई आवश्यक’   

पुणे : मनुष्याच्या आस्तित्वासाठी घनवन आणि देवराई याचे जाळे वाढणे आवश्यक आहे, असे मत विधानपरिषदेच्या सभापती डॉ. निलम गोर्‍हे यांनी व्यक्त केले. ग्रीन हिल्स ग्रुप या संस्थेतर्फे देवराई फाउंडेशन, सहयाद्री देवराई, वनाई नैसर्गिक शेती फार्म आणि कृषी पर्यटन केंद्र या संस्थांच्या सहकार्याने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देवराई संकल्पनेवर आधारित प्रदर्शन आणि प्रकल्पांचे बालगंधर्व कलादालनात आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन डॉ. गोर्‍हे यांनी केले. त्यावेळी त्या बोलत होत्या. 
 
यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी., पुण्याचे उपवनसरंक्षक महादेव मोहिते,जेहलम जोशी,पर्यावरण संवर्धन अधीक्षक मंगेश दिघे, ग्रीन हिल्स ग्रुपचे प्रमुख अतुल वाघ, देवराई फाउंडेशनचे रघुनाथ ढोले, भूजल विज्ञान शास्त्रज्ञ उपेंद्र धोंडे, देववन संकल्पनेचे किशोर मोहोळकर आणि वनाई नैसर्गिक शेती फार्म व कृषी पर्यटन केंद्राचे सहसंचालक अथर्व वेताळ, सह्याद्री देवराईच्या स्मिता जगताप आदी उपस्थित होते. 
       
डॉ. गोर्‍हे म्हणाल्या ,येत्या कालावधीत आपल्या सर्वांना रिफ्युज,रियुज , रिड्युस,रिसायकल आणि रिथिंक या पाच  ‘आर’ वर काम करावे लागणार आहे. किल्ले आणि दुर्ग संवर्धनासाठी राज्य  सरकारने तीन टक्के निधी मंजूर केला आहे. या निधीच्या माध्यमातून पर्यावरणाच्या दृष्टीने अधिकधिक काम करण्याची गरज आहे.त्याच बरोबर आपण सर्वानीच वनविभागाच्या ज्या जागा आहेत. त्यासाठी सर्वांनी पुढे येऊन काम केले पाहिजे. त्या पुढे म्हणाल्या, प्रत्येक तालुक्यात देवराई निर्माण करण्याचा निर्णय राज्य सरकारने  घेतला आहे. सध्याचा काळ सोशल मिडीयाचा असून या माध्यमांचा वापर करून योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याच काम करावे.  

Related Articles